Saturday, May 4, 2024

वट्टपोतक_जातक_चर्या

वट्टपोतक_जातक_चर्या




जंगलात जेव्हा भिषण आग लागते तेव्हा ती आग आपल्या मार्गातील सर्वच वस्तुंना जाळुन खाक करते. या भिषण अग्निमध्ये काही निरपराध जीव आपले प्राण गमावून बसतात, काहीही चुक नसताना. ज्यांमधे क्षमता व ऐपत असते ते या अग्निला घाबरून पळ काढुन आपला जीव वाचवतात पण.....
काही निरपराध जीव ज्यांना पाय असुनही चालता येत नाही. पंख असुनही उडता येत नाही, असे जीव मृत्युला उघड्या डोळ्यांनी पाहुन मृत्युचा असहाय होऊन स्विकार करतात.....
जिवण व मृत्यु यांमध्ये जे काही क्षणांचे अंतर असते, जे लोक हे क्षण अनुभवुन या परिस्थती मधुन तरुन किंवा मरुन जातात त्यांची मानसिक परीस्थिती शब्दांत सांगणे कठीणच नाही तर अशक्य आहे.
खुपच मोठें संकट आल्यावर परकेच काय तर आपले जीवलग सुद्धा आपल्याला सोडून जातात. ती वेळच वाईट असते. अशीच एक घटना आहे वट्टपोतक बोधिसत्व यांची, जंगलात भिषण अग्नि प्रज्वलीत होते व वट्टपोतक यांचें आई वडील परिस्थितीची गंभीरता पाहून आपल्याच मुलास सोडून जाण्याचा दुर्दैवी निर्णय घेतात..... नाईलाजाने.
#वट्टपोतक_जातक
वट्टपोतक चर्या ही चरियापिटक ग्रंथामधील बोधिसत्व वट्टपोतक यांची सत्य पारमितावर आधारित जिवण चर्या आहे.
वट्टपोतक म्हणतात की
जेव्हा मी मगध देशात पंख न फुटलेला तरुण मांसाचा गोळा असा घरट्यामध्येच राहणारा लहान लावा पक्षाचे पिल्लू होतो, तेव्हा चोचीने दाणे आणुन माझी आई माझे पालन पोषण करीत होती. मी तिच्या स्पर्शाच्या आधाराने जगत होतो, माझ्यामध्ये शारीरिक बळ नव्हते.
दरवषी उन्हाळ्यात अरण्यामध्ये वणवा पेटत असे व तो आपल्या मार्गातील सर्वांची काळीराख करणारा अग्नी दरवर्षी आमच्या घरट्यांकडे येत असे. 'धमधम’ असा मोठा आवाज करीत नेहमीप्रमाणे शिखारूपी ज्वाला धारण करणारा तो अग्नी, वाटेतील सर्व वस्तू क्रमाक्रमाने जाळत आमच्या घरट्यांपर्यंत आला. तेव्हा अग्नी वेगाच्या भयाने घाबरलेले व त्रस्त झालेले माझे आई-वडील मला घरट्यात एकटं सोडून उडून गेले व त्यांनी स्वत:ची सुटका करून घेतली. मी पाय व पंख फडफडले परंतु माझ्यात शारीरिक बळ नव्हते. त्यामुळे मी तेथे अगतिक होऊन असा विचार केला की, 
भयभीत, त्रस्त व थरकाप झालेला मी ज्यांच्याकडे आधारासाठी जावे ते माझे आई वडील मला संकटात एकट सोडून निघून गेले, मी एकटा आता काय करावे?
पण 
अजुनही जगात शीलगुण, सत्य, पावित्र्य व करुणा आहे याच सत्याच्या सामर्थ्याने मी आता उत्तम सत्यवचन क्रिया करीन.
 धम्म सामर्थ्याचा विचार करून व पुर्वकाळातील बुद्धांचे स्मरण करून सत्याच्या बळाच्या सहायाने मी सत्यवचन क्रिया केली.
"माझे पंख आहेत, पण ते उडण्यायोग्य नाहीत, माझे पाय असुनही मी चालू शकत नाही. मला आई-वडील संकटात एकटं सोडून गेले आहेत. आई वडीलही आता माझी मदत करु शकत नाही. या सत्य वचनाच्या सामर्थ्याने हे अग्नी तु परत जा."
मी सत्यवचन क्रिया केल्याबरोबर, महाप्रज्वलित झालेला अग्नी माझ्यापाशी येऊन पोहोचल्यावर सुद्धा नष्ट होणाऱ्या अग्नीप्रमाणे, सळसळ करीत भूमी मागे जाऊन नाहीसा झाला. सत्यवचना मध्ये माझ्यासारखा दुसरा कोणी नाही. ही माझी सत्यपारमिता होती.
संदर्भ....
चरीयापिटक, खुद्दक निकाय

(राहुल खरे ,यांच्या fb वॉल वरुण साभार )

Friday, May 3, 2024

जगदंबा मंदिर- टाहाकारी

 


संगमनेरला लागून असलेल्या अकोले तालुक्यातील प्राचीन मंदिराचा परिचय व्हायला निम्म आयुष्य जाव लागल. अकोल्यातील सिद्धेश्वर, गंगाधरेश्वर, रतनवाडीचे अमृतेश्वर नंतर वॉचलिस्टवर होते ते  आढळा तटावरचे टाहाकारी गावातले जगदंबा मंदिर. गेलो त्या दिवशी नेमका वार्षिक उत्सव असल्याने विश्वस्त व सुहृद डॉ विष्णू एखंडे जातीने हजार होते.  टाहाकारीचे जगदंबा मंदिर हे यादवकालीन म्हणले जाते .चुन्याचा दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून तयार केलेली वास्तू हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते. बांधकाम करण्यासाठी चुना, माती न वापरल्याने या मंदिरांचे बांधकाम कोरडे आहे. 
बाह्य  भिंत अगदी छोटय़ा-छोटय़ा अंतरावर विविध कोनात दुमडली आहे. या दुमडलेल्याप्रत्येक छोटय़ा भिंतीच्या मध्यावर ओळीने हे मूर्तिकाम केलेले आहे. काही ठिकाणी देव दानवांच्या मूर्ती तर काही ठिकाणी सैनिक, व्याध, देवतामूर्ती अशी शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या दगडींवर कलात्मक शैलीतील स्त्रियांची कोरीव मुर्त्या आहेत. भिंतीचा बाह्य़ भाग आणि खांबांवर मुक्त हस्ते कोरीव काम केलेले. बाह्य़ भागावर शिव, पार्वती, गणेश, देवी आदी देवता; हत्ती, व्याल, घोडे असे प्राणी. यक्ष-यक्षिणी, अप्सरा, सुरसुंदरी आदी देवगण आणि जोडीने काही मैथुनशिल्पेहीकोरलेली! या मूर्तिकामात गणेश, शिव-पार्वती, चामुंडा आदी देवतांबरोबरच सुरसुंदरीचे तब्बल बावीस आविष्कारप्रकटले आहेत. सुरसुंदरी म्हणजे देवांगना. देवांच्या खालोखाल त्यांचा मान! त्यांच्या रचना-शैलीतून तत्कालीन कला आणि सौंदर्याचे अनेक आविष्कार उलगडतात. कधी आरशात स्वत:चे सौंदर्यपाहणाऱ्या, कर्णभूषणे घालणाऱ्या, केसात गजरा घालणाऱ्या, केशशृंगार करणाऱ्या अशा - ‘दर्पणा’, तर कुठे नृत्य अवस्थेतील नृत्य सुरसुंदरी! बासरी, मृदंग वाजवणाऱ्या, हाती पक्षी घेतलेल्या शुकसारिका, मुलाला घेतलेल्या मातृमूर्ती असे विविध रूपे 
मंदिराची रचना अष्टकोनाकृती असून त्याचे अंतराळ, मंडप, गाभारा, या भागात विभाजन केलेले आहे. मंदिरास बाहत्तर दगडी खा॔ब आणि पाच कळस आहेत. त्रिदल पद्धतीचा गाभारा, अंतराळ, सभामंडप, मुखमंडप अशी मंदिराची रचना. यातील मुखमंडपच दहा खांबांवर आधारित आहे.  मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आतील व बाहेरील बाजूस रंभा, मेनका, उर्वशी, तसेच इंद्र देवाच्या दरबारातील प-या नृत्य करताना कोरलेल्या आहेत. मंडपाला असणा-या बारा खांबापैकी आतील बाजूस स्तंभ शिर्षापासून छतापर्यंत दोन अप्सरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. सभामंडप आणि अंतराळाच्या खांबावर विविध भौमितिक आकृत्या,यक्ष प्रतिमा आणि देव-देवतांचे मूर्तिकाम केलेले आहे.  सभामंडपाच्या छतावर एकात एक गुंफलेली वर्तुळे आणि मधोमध लटकणारे एक दगडी झुंबर आहे. अंतराळात काही देवकोष्टेही आहेत. मुख्य गाभाऱ्याच्यादरवाजावरही बारीक नक्षीकाम केले असून, त्याच्या शीर्षपट्टीवर गणेशाऐवजी देवीची संकेतमूर्ती स्थापन केली आहे.

मंदिराच्या बाहेरील भि॔तीवर शिल्पे कोरलेली आहेत.  मंदिरात प्रवेश करताच समोर श्री जगदंबा मातेच्या उभ्या मुर्तींचे दर्शन घडते. श्री जगदंबा मातेची मुर्तीं संपूर्ण लाकडात कोरलेली आहे. या देवीच्या मुर्तींला अठरा हात आहेत आणि याहाता॔मध्ये विविध प्रकारची आयुधे आहेत. या मुर्तींचे वैशिष्ट असे की, श्री जगदंबा माता वाघावर आरूढ असून ‘महिषासुरमर्दनाचा’ देखावा येथे सादर केला आहे. मंदिराच्या गाभार्‍यात दोन्ही बाजूस-पूर्वस महालक्ष्मी आणि पश्चिमेस भद्रकाली (महाकाली) अशा देवीच्या सुबक मुर्तीं आहेत.

CPW

भारत की पहली महिला रेसलर हमीदा बानो.

भारत_की_पहली_महिला_रेसलर_हमीदा_बानो. 

जानें कौन थी भारत की पहली महिला रेसलर, गूगल ने आज ही क्यों बनाया डूडल.. ???

आज ही के दिन 1954 में आयोजित एक कुश्ती मैच में केवल 1 मिनट और 34 सेकेंड में जीत दर्ज करने के बाद हमीदा बानो को अंतरराष्ट्रीय स्तर पर पहचान मिली। उन्होंने प्रसिद्ध पहलवान #बाबा_पहलवान को हराया। 

गूगल ने अपने डूडल के डिस्क्रिप्शन में कहा है, “हमीदा बानो अपने समय की अग्रणी थीं और उनकी निडरता को पूरे भारत और दुनियाभर में याद किया जाता है। अपनी खेल उपलब्धियों के अलावा, उन्हें हमेशा खुद के प्रति सच्चे रहने के लिए मनाया जाएगा।"

गूगल के आज के इस डूडल को बेंगलूरू की गेस्ट कलाकार #दिव्या_नेगी ने तैयार किया है। डूडल के बैकग्राउंड में Google लिखा हुआ है, जो स्थानीय वनस्पतियों और जीवों से घिरा हुआ है। हमीदा बानो को 'अलीगढ़ की अमेजन' के नाम से भी जाना जाता है। 

उनका जन्म 1900 के दशक की शुरुआत में उत्तर प्रदेश के अलीगढ़ के पहलवानों के एक परिवार में हुआ था। वह कुश्ती की कला का अभ्यास करते हुए बड़ी हुईं और 1940 और 1950 के दशक के अपने करियर में 300 से अधिक प्रतियोगिताओं में जीत दर्ज की।

शादी के लिए रखी शर्त

हमीदा बानो ने 1940 और 1950 के दशक में चुनौती देते हुए कहा था कि जो भी उन्हें दंगल में हराएगा वे उससे शादी करेंगी। हमीदा के साथ किसी पुरूष के साथ पहला कुश्ती मैच  लाहौर के फिरोज खान के साथ 1937 में हुआ था और इस मैच से उन्हें काफी पहचान मिली। हमीदा ने फिरोज खान को चित कर दिया था। इस मैच के बाद हमीदा ने एक सिख और कोलकाता के एक अन्य पहलवान खड़ग सिंह को हराया। इन दोनों ने हमीदा से शादी करने के लिए चुनौती दी थी।

#विशेष : डाइट थी चर्चा का कारण 

बानू जब रेसलिंग रिंग मे उतरती थी तो विरोधी उन्हे देखकर ही डर जाता था । 5 फिट 3 इंच लंबी बानू का वजन 108 किलोग्राम था । 

एक दिन के डायट मे शामिल था - 2. 8 लीटर सूप .1.8 लीटर फ्रूट जूस । एक देशी मुर्गा ,एक किलो मटन, एक किलो बादाम आधा किलो घी ,6 अंडे और दो प्लेट बिरयानी शामिल थी । 

कोच के साथ अलगाव ने खत्म किया करियर 

उन्होंने भारत मे मिली सफलता के बाद फैसला किया था की वह यूरोप जाकर लड़ेगी लेकीन एसा हुवा नहीं । एसा कहा गया है की हमीदा के बानू अचानक रेसलिंग के दुनिया से गायब हो गयी । कोच सलाम पहेलवान रेसलर का यूरोप जाने का फैसला पसंद नहीं था । हामिदा बानू के गोद लिए बेटे मोहहमद शेख ने बताया की हमीदा को रोकने के लिए उन्हे बहुत पीटा जाता था और उनके पैर टूट गए थे । इसके बाद वह रेसलिंग के दुनिया मे दुबारा लौट नहीं नहीं पाई ?

BR

(टेक डेस्क, अमर उजाला, नई दिल्ली Published by: प्रदीप पाण्डेय Updated Sat, 04 May 2024 10:05 AM IST, जनसत्ता ) 







Monday, April 22, 2024

#लाईफ_वार्निंग_बेल

 #लाईफ_वार्निंग_बेल

.. .. .. प्रा. बा.र .शिंदे
लिखने की वजह ये है की ,आप लोग सभी एप और मीडिया से सतर्क रहे ।
इसी महीने मे मेरे परिचय के करीबन चार लोगों ने आत्महत्या की है और दो लोग इसिका शिकार हुए है ।
बात यह है की की आप जितना होशियार बनोगे उतना गर्द गहराई मे फस जाओगे ।
1. आपने फेसबूक अकाउंट मे कभी अपरिचित पोस्ट मे लाइक न करे ,आपका एक लाइक आपके मोबाइल का पूरा डाटा कारीफ़ोरवर्ड करता है । जैसे की OTP.
2. messenger पर कभी किसिको दोस्त न बानए ? messenger से दूर रहे ।
३. कोई unknown लिंक पे क्लिक न करे ।
४ . सिर्फ और सिर्फ डेस्क टॉप और लैपटॉप पे fb और अन्य एप चलाए जहा आपका IME ( Input Method Editor ) किसिको पता न चले ।
#घटना_क्र १ . लातूर
मेरे करीबी मित्र के एक लौते बेटे ने घर मे फाशी लेकर खुदखुशी करने का प्रयास किया ,लेकीन वह बचा है ,और पुणे मे एक अस्पताल मे ICU मे आपना जीवन संघर्ष कर रहा है .. वजह - मोबाईल पर ब्लैक मेल हुवा है ।
#घटना_क्र २ . लातूर (घरनी ) :
३० साल का नवजवान कोई मोबाइल अफ़ैर मे अटक गया और घर मे पंखे को लटकर आपना जीवन समाप्त किया है ।
#घटना_क्र ३ . मालाड,मुंबई
मेरे ही आपने परिवार के लड़के ने मोबाइल पर लोन ५० हजार लिया और उसे ५ लाख भरने पड़े । नतीजा online कर्ज मत लो ।
#घटना_क्र ४ . बांद्रा ,मुंबई
मेरे पहचान के मित्र ने कई messenger पर किसकी लड़की से बात की ,उसने नेकेड फैक वीडियो बनाई और उसे ब्लैक मेल सुरू हुवा । और मांमाला पोलिस तक गया ( झुट ) उनसे ७५ हजार लिए गए ।
आपं पैसा नहीं दोंगे तो आपकी बीवी को बताएंगे ? डर के मारे पैसा दे दिए । आगे उन्होंने कॉल को लगातार रीस्पान्स नहीं दिया मामला खत्म हुवा । वर्ना आगे क्या होता कोई पता नहीं ?
#घटना_क्र ५ : घनसोली ,नवी मुंबई ।
मरे पहचान के मित्र की एक २० साल की लड़की किसी एक कारखाने मे काम करती थी ,उसका #Instagram पर प्यार हुवा ,जिस दिन शादी थी उसी दिन आपने फ्रेंड के साथ घर छोड़कर भाग गयी । मेरा दोस्त अभी उसकी के खोज मे है ?
#होशियार : आपका मोबाइल जितना स्मार्ट है उतना ही जहरीला है ! आपके हात मे रहकर आपको खत्म कर सकता है ।
यह नाइट creature है । बेड्बग याने की खटमल की तरह रात मे निकलते है ।
वे भारतीय है और परकीय भी है ?
( #Netflix पर #जमतारा जिसने देखा है वह समज जाएगा ,यह लोग गृह मंत्री के बैंक खातों से भी पैसा निकाल लेते है )
रात मे आपने स्मार्ट फोन को न छूए ,कोई App पर न जाए । आपने कुटुंब के साथ गप्पे मारे ,बीवी ,बच्चे ,माँ बाप ( अगर साथ मे है ) तो उनकी सेवा करे और पुंछ ताछ करे ,कोई किताब हो तो पड़ते पड़ते सो जाए ,सुकून की नींद आएगी ,वर्ना सुबह कोई रिंग आएगी .. Hi Dear
फिर रोना नहीं कोई बचाने नहीं आएगा ?
जब कोई unknown she/he आधी रात को , आपको ,hi how are you dear कहे तो आप फिशिंग होने वाले हो । इतना तय है । संसार मे आपने परिवार के सिवा कोई डिअर नहीं होता है ?
आप बचे आपके परिवार को बचाए ! परिवार बचेगा तो सब कुछ बचेगा !!
( किसके साथ और कोई इस तहर की घटना घटी हो तो बताए ?)
आपका सोशल मीडिया का दोस्त इस तरह होगा ? जो चित्र मे दिया है !

Saturday, November 4, 2023

अमर्त्य सेन

 



"आज मीतिला चीन मध्ये पाच कोटी पुरुष असे आहेत ज्यांना चिनी समाजातून वधू सापडू शकलेली नाही."

जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात निरक्षरता असेल तर अशा समाजात अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य निरोपयोगी आहे. आपण फक्त न्याय आणि  योजना  करण्यापेक्षा त्यांच्या परिणामाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. 

#अमर्त्य_सेन 

नुकताच ३  नोव्हेंबर रोजी जगप्रसिद्ध अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.  सुरुवातीला नोबेल आणि  नोबेल नंतर भारतरत्न असा जगप्रसिद्ध प्रवास करणारे अर्थशास्त्रज्ञ म्हणजे अमर्त्य  सेन . 

देशातील आणि जगभरातील आर्थिक व्यवहाराच्या अभ्यास करीत असताना मानवता आणि स्त्रियांचे मूल्ये कशी जोपासावे यावर त्यांनी जगभरात संशोधन केले. 

१९०९  मध्ये अमर्त्य सेन यांनी पाक्षिक तत्वावर प्रसिद्ध होणाऱ्या “न्यूयॉर्क रिवीहव ऑफ बुक्स” या यामध्ये एक प्रभावी शोधनिबंध लिहिला होता.  त्यात त्यांनी आशियाई देशांमधील वाजवीपेक्षा खूप जास्त राहिलेल्या मृत्युदराचे काळजीपूर्वक परीक्षण करून ते या धकादायक निकषावर पोचले होते स्त्रिया मुळातच काटक  आणि जीवशास्त्रीय रचनेनुसार पुरुषापेक्षा स्त्रीचे आयुमान पुरुषा पेक्षा  अधिकच असते. असे असून देखील , जगात स्त्रिया कशा कमी होत चाललेले आहेत त्याचीही त्यांनी इथं  कारण मीमासा केलेली आहे .. 

स्त्रीभ्रूणहत्या ,जन्मापूर्वी मोठ्या प्रमाणात लिंग निर्धारण चाचणी, लिंग प्रणित गर्भपात यासारख्या समस्या कडेही त्यांनी लक्ष वेधले . जगत लोकसंखे मुळे चीन आणि भारत हे या स्त्रीविरोधी अंत प्रवाहाचे मुख्य योगदान करीत  आहेत आणि एकच अपत्य धोरणामुळे चीनमध्ये पुरुष मुलाला स्वभाविकच अधिकच प्राधान्य दिले गेले ,याचा परिणाम काय तर आज तेथे  पाच कोटी पुरुष असे आहेत ज्यांना चिनी समाजातून वधू सापडू शकलेली नाही.? तीच गत भारतात का होणार नाही ? 

अशा अनेक विविध पैलू वर विचार करीत असताना जगात स्त्रियांची मृत्यूचे प्रमाण कसे कमी होत आहे याचे त्यांनी अनेक शोधनिबंध तयार केले आहेत . 

भारत देशामध्ये दुष्काळामुळे किंवा उपाशीपोटी अनेक लोक मरताना दिसत आहेत. इथे ते १९६०  चा चीनमध्ये झालेला दुष्काळ यावर भाष्य करतात . हे होत असताना मोठ्या प्रमाणात त्या काळा मध्ये  झालेली मृत्यू हे भारतातील याच काळातील स्थितीच्या अगदी उलट आहेत सेन यांनी असेही प्रतिपादन केले आहे की बहुतेक दुष्काळ हे नैसर्गिक कारणामुळे नव्हे तर मानवनिर्मित कारणामुळे होत असतात  . 

असे अनेक जगभरात शोधनिबंध लिहिणारे भारतातील लोकशाही वर ही भाष्य करतात. 

त्यांच्या योगदानातील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे ‘न्यायाची कल्पना आणि न्याय व नीती’ या संकल्पना मधील फरक सांगणारी  आहे.  न्याय हे परिणाम करते व अधिक भर असणारे आणि सामाजिक व्यवस्थेकडे कमी लक्ष देणारे आहे, तर नीती ही सामाजिक धोरण आणि योजनांची घडणी आहे. 

 त्यांनी एक उत्तम उदाहरण दिले आहे ‘  तर असा युक्तिवाद केला आहे की जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात निरक्षरता असेल तर एक परिणाम म्हणून अशा समाजात अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य सामाजिक व्यवस्था किंवा तत्व निरुपयोगी आहे ‘ त्यांचे म्हणणे हेच की आपण फक्त न्याय कायदे आणि योजना करण्यापेक्षा त्यांच्या परिवाराकडे अधिक लक्ष दिले पाहिजे . चित्रपट निर्माता  मुजफ्फर अली यांनी एकदा या संबधाचे टिपण करताना म्हणले होते की,  ‘तुम्ही जर माझी जीभ छाटून टाकली तर माझ्या भाषण स्वातंत्र्याचा मला काय उपयोग ?  सेन यांचे समाजा वरील कार्य पारदर्शक आहे. 

संधी निर्माण करीत असताना त्या संधीचा भाग जनसामान्य माणूस झाला पाहिजे अशी त्यांचे  मत आहे त्यात मूलभूत शिक्षण आणि आरोग्यसेवा तसेच रस्ते व स्वच्छतेची सुविधा यासारख्या सार्वजनिक वस्तू सेवा सुविधांचा आणि त्या पुरवणे ही सरकारची किंवा राज्यकर्त्यांची जबाबदारी असेल. 

अमर्त्य सेन यांना १९९८  मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले तेव्हापर्यंत नोबेल  मिळणाऱ्या जवळपास ९०० व्यक्तींमध्ये हा पुरस्कार मिळवणारे हे  केवळ सहावे  भारतीय होत. १९१३  मध्ये पुरस्कार पटकावणारे पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर होती.  त्यांनी शांती निकेतन मध्ये जन्मलेल्या या  अर्थशास्त्रज्ञांची अमर्ते असे नामकरण त्यावेळी केले होते. 

 पंतप्रधान बाजपाई  यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने अमर्त्य सेन  यांना नोबेल नंतर लगेच भारतरत्न बहाल  केले यात आश्चर्य वाटण्या सारखे कांही नाही ? 

 सेन यांनी आपली सर्व कमाई प्राथमिक शिक्षणात काम करणाऱ्या एका ट्रस्ट ला  दान केली आहे 

हे वर्ष सेन यांची नोबेल पारितोषिक मिळविण्याचे तसेच त्यांनी वयाची नव्वदी  ऊलटल्याचे आहे सेन यांचे जीवन आणि त्यांची कामगिरीही विशेषता शिक्षण वेत्यासाठी  निश्चितच प्प्रेरणादायी आहे.  त्यांचे शिक्षण शांतिनिकेतन प्रेसिजन्सी कॉलेजमध्ये झाले प्रत्येक टप्पा त्यांनी सर्वोच्च गुण मिळवून उत्तीर्ण केला आणि केंद्रित विद्यापीठातील ते बीए मध्ये पहिले आले नंतर तिथेच त्यांनी बी एच डी केली ते माधवपूर विद्यापीठात त्यांचे विभागात  सर्वोच्च तरुण अध्यापक  होते आपल्या कारकिर्दीत त्यांनी दिल्ली स्कूल ऑक्सफर्ड ,केंब्रिज , हवर्ड  आणि इतर अनेक ठिकाणी अध्यापन केले आहे. 

एकदा तीन हजार विद्यार्थ्यांसमोर एका मोठ्या सभेत त्यांना उत्सुकतेने एक प्रश्न विचारण्यात आला सर भारत महासत्ता कधी होणार ? यावर त्यांनी असे उत्तर दिले की त्यांना या शोधात मला  अजिबात रस नाही भारताने सर्व मुलांसाठी उच्च दर्जाचे शिक्षण आणि प्राथमिक आरोग्य सेवा दिल्यावर भर दिला तरी पुरेशी आहे . असे त्यांनी सुचविले होते. 

 मोदींच्या नेतृत्व शैलीवर त्यांनी विरोधी कडवट टीका केली आहे त्यांनी जॉन स्टुअर्ट मिल यांचे विचार मंथन  करीत म्हटले होते की लोकशाहीचे चर्चेद्वारे घडणारे सरकार असते आणि जर तुम्ही चर्चेचे प्रांगण भयभीत  करून टाकले तर तुम्हाला खरी लोकशाही मिळणारच नाही ? 

 नालंदा विद्यापीठाची कुलूपती म्हणून सेन यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला होता आणि मोदी सरकारने २०१५  मध्ये त्यांच्या कार्यकाळाला मुदतवाढ दिली नाही .एका  प्रेक्षक सदस्यांनी त्यांना भर सभेत विचारले की तुम्ही कधी चीनमधील जीवन जगला आणि मी अनुभवला आहेत का ? जरूर काय तो त्यांना विनोद होता अशा टिकेकडे सेन यांनी पारसे  लक्ष दिले नाही . त्यांच्या वैयक्तिक जीवनावर एक टीकाकाराने  टोमणे मारले होते . 

त्यांचे वैयक्तिक जीवन हेवा  वाटावे अशी मनोहर आहे . त्यांनी तीनदा लग्न केले होते . त्यापैकी एक चित्रपट अभिनेते देखील आहे. ते  कसा आराम करतात असे विचारल्यावर त्यांना उत्तर असते की आवडीच्या विषयावर खूप वाद आल्याचा मिळणे हाच आराम त्यांनी . ते स्वतः नास्तिक आहेत आणि नास्तिकतेवरील संस्कृत अभिजात साहित्यातील विपुद्देकडे निर्देश करून ते त्यांना भूमिकेचे समर्थन करतात ते त्यांची राजकीय विचार व्यक्त करण्यास पचली नाही 

सेन डाव्या  विचारसरणीचे आहेत परंतु अति  डाव्या विचारसरणीच्या लोकांपासून सावध राहावे असा ते  सल्ला देतात . कल्याणकारी अर्थशास्त्रज्ञ सामाजिक निवड सिद्धांत विकास अर्थशास्त्र तत्त्वज्ञान आणि नैतिकता अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी मूलभूत योगदान दिले हे सर्वश्रेष्ठ आहे .  अमर्त्य सेने असे समाज धर्मी विचारवंत आहेत जी प्रजाती आज दुर्मिळ बनला चालली आहे युक्तिवाद आणि तर्कशास्त्राच्या पद्धतीची जी वचनबद्ध रहा त्यांनी कायम विवेकाची कास धरली आणि तरी सत्ता शक्तीपुढे गरज पडल्यास खरे  बोलण्यास ते घाबरले नाहीत . 

अश्या बुद्धिजीवी महान अर्थतज्ञ , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार प्रणालीच्या  महान व्यक्तीस उत्तम आरोग्य मिळो  ,हीच  त्यांना हार्दिक   शुभेच्छा !!!


प्रा बी आर शिंदे ,नेरूळ नवी मुंबई ४०० ७०६ 

Saturday, September 16, 2023

आर्यसत्य ( Nobel Truths )


आर्यसत्य ( Nobel Truths  ) अजून कोणत्या संप्रदायात किंवा धर्मात असतील तर कळवा ?

१ पहिले आर्यसत्य – दुःख

२ दुसरे आर्यसत्य – दुःखाचे मूळ

३ तिसरे आर्यसत्य – दुःख निरोध

४ चौर्थ आर्यसत्य – दुःख निरोधाचा मार्ग




महामानव डॉ बाबासाहेब आंबेकर द जुरिस्ट!

महामानव_डॉ_बाबासाहेब_आंबेकर_द _जुरिस्ट!

----------- प्रा.बा.र.शिंदे,नेरूळ नवी मुंबई 

प.पू.डॉ.बाबासाहेब हे एक असे दालन आहे जे जयभीम म्हणून ही कळत नाही मग जगातील कोणतीही शिक्षित व्यक्ती का असेना.जगातील तमाम विद्वान लोकांनी त्यांच्या बुध्दीमत्तेला जयभीम करून मार्क्स पासून बाबसाहेब कसे वेगळे आहेत.ते एक ज्यूरिस्ट कसे होते याची उखल केलेली आहे.ते घटनाकार तर होते पण ते जुरिस्ट कसे होते याचे  अनेक उदा.देता येतील.

 सन १९३५ ते १९५६ हा काळ त्यांचा ' द जूरिस्ट ' म्हणून गणला जातो.मी जरी व्यवसायाने वकील नसलो तरी बाबासाेबांबद्दलचा वकिलीचा  असलेला पेशा आणि  मिळकत सेवाभाव जाणतो.

तेंव्हाच्या बॉम्बे युनि्हसिर्टीतून ५जुलै १९२३ ला त्यांनी जी सनद घेतली ती केवळ पददलित वर्गलाच न्हवे तर ,जगातील तमाम बॅकवर्ड वर्गाला त्या सनदचा कसा फायदा होईल हेच त्यांनी केलं.

एकच उदा.संपूर्ण कहाणी सांगून जाते.एका केस मध्ये बॅरिस्टर जिन्हा यांनी त्या काळी २५१००/- फिस मागितली तर बाबासाहेबांनी ती केस केवळ २६५/- रुपयात जिंकून दिली.विचारवंताला हे एक उदा.पुरेसे आहे.

मला थोडे बाबासाहेब कळतात म्हणून मी तो कार्यक्रम संपला तेंव्हा स्टेज वर जाऊन हा फोटो छातीला लाऊन घेतला.माझा मित्र सुलील पवार (PLL,Mumbai University) याने टिपला आहे.असा मला कोणी भेट वगैरे नाही दिला आहे.

कारण असे होते मोठ्या दिग्गज लोकांना हा पूर्णाकृती पुतळा नको होता,त्यांनी हार तुर्या सहित स्टेजवर ठेवला कार्यक्रम संपला आणि निघून गेले.केवळ आणि केवळ कार्यक्रमाची शोभा म्हणून तर आणले नसावे.?

आता मुद्धा असा आहे की बाबासाहेब हे कसे जुरिस्ट होते आणि जूरिस्ट कोणाला महणावे.

वर सांगितल्या प्रमाणे त्याने १९३५ ला  धर्म बदलण्याची जी घोषणा केली ती १९५६ सली खरी करून दाखवली त्याच कारणाने ते #जुरिस्ट ठरतात.

अश्या आणि अनेक वास्तव सुपीक कल्पना त्यांनी मांडल्या आणि त्या खऱ्या करून दाखवल्या म्हणून ते jurist म्हणून ओळखले जातात.

मग महाड चे चवदार तळे संघर्ष असो की काळाराम मंदिर प्रवेश असो.जे जे वदले ते ते त्यांनी  क्रांतीत रूपांतर केले.

या क्रांतीच्या पाऊल खुणा या जगातील अव्वल दर्जाचे jurist म्हणून ओळखायला भाग पाडतात.

त्यांच्या पश्चात कोणी अशी क्रांती केली नाही म्हणून तसा 'THE JURIST ' कोणी होत नाही.म्हणून ते प्रज्ञासुर्य, क्रांतीबा होतात.

समतेच्या,शांतीच्या , धम्माचा वाटेवर घेवून जातात म्हणून ते जगात #ज्यूरिस्ट म्हणून ओलखले जातत.इथेच क्रांतेयबुद्ध ,महामानव म्हणून ही ते ओळखले जातात .

तसे ते पुतळ्यात नाहीत असे नाही, पण ते मला त्यांच्या साहित्यात उजळून दिसतात.मग ते साहित्य त्यांचे असो किंवा त्यांचावर जगातील कोणत्याही कवी ,कथाकार ,लेखक यांनी लिहलेले असो.त्यात त्यांचे प्रतिबिंब दिसते ते खरे.


(स्थळ दीक्षांत सभग्रह ,मुंबई विद्यापीठात, फोर्ट)






Friday, September 15, 2023

३१ अगस्त नंतर सगळ्या महामानवास तिलांजली देऊन बहुजनांच्या घरा घरात गणराया येणार?

 


३१ अगस्त नंतर सगळ्या महामानवास तिलांजली देऊन बहुजनांच्या घरा घरात गणराया येणार?

-------------------- प्रा.बा.र.शिंदे 

लोक जागर,महोत्सव ,जयंती ,जयंती- उत्सव सभा,चर्चासत्र,मेळावे ,प्रचार, यात समाज प्रबोधन करीत विद्वान व्यक्ती, प्राध्यापक,डॉक्टर ,अभियंता,आणि शिक्षक - शिक्षिका यांनी ऑगस्ट चा महिना पिंजून काढणार?

कार्यकर्ते गल्ली बोळात जाऊन ' जय लहूजी ' चा नारा देत, लोकशाहीर,डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे,बघता काय सामील व्हा.असे आणि कैक नारे देत चंदा काढून जयंती साजरी करणार? कारण ते आपलेच महामानव आहेत.आपणास पट्टी देणे भाग आहे.हे त्यांचे रास्त मत असते? आणि तसे असणे साहजिक आहे.

झोपडपट्टीतील घराला दार नसले तरी,तेथून ते तमाम चाळी -चाळी तून अमाप पैसा जमा होणार.याच दिमतीवर जयंती साजरी होते.

एकदाची कार्यकर्ते नेते मिळून जयंती साजरी करणार? पदरात काय? पुढील ऑगस्ट ची वाट पाहावी लागते.

आता जसा ३१ ऑगस्ट निघून जाईल तसा दुसऱ्या कार्यक्रमाचे वेध लागते,ते म्हणजे ,गणराया येणार?

तुम्ही कांहीं म्हणा गणराया आमच्या घरी येणार, म्हणजे येणार?

आपणास विचार करायला हवा की ,आपली बुद्धी शुद्ध नसते.आपले डोके इतरांच्या इशाऱ्या वर चालते.म्हणून असे उद्योग सुचत असतात.

राजा शिवराय ,राष्ट्रपिता  महात्मा फुले ,शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारात ,साहित्यात कुठे गणपती या शब्दाचा उल्लेख मिळतो का?

मग आपण या महामनवाचे वारसदार कसे ? तर नाही! आपण या महामानवाला खऱ्या अर्थाने तिलांजली देत आहेत.

संकट में। हिंदू धर्म के बाद अभी सनातन (धर्म ?) भी संकट में।

संकट में।..

हिंदू धर्म के बाद अभी सनातन (धर्म ?) भी संकट में!

........................प्रा.बा.र.शिंदे,नेरूळ

तमिलनाडु चे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन  यांनी सनातनवर मोठे संकट निर्माण केलं आहे.
सनातन हाधर्म नसून ही एक भ्याड प्रवृत्ती आहे.सनातन ची  तुलना ते डेंगू, मलेरिया असे करता. सनातन हा हिंदू धर्माचा भाग आहे हे भक्तांना वेगळे वाटत नाही.?
तसे पाहता सनातन या शब्दाचा अर्थ प्राचीन काळापासून चालेल आलेला चिरंतन ,अविनाशी असा आहे.(Orthodox)
आत्मा , पुनर्जन्म या संकल्पना मानत असलेल्या हिंदू धर्माला सनातन धर्म असे म्हटले जाते.
तसे पाहता वेदामध्ये कुठेही सनातन धर्म असा उल्लेख आढळ नाही .हिंदू धर्मात सनातन ही संकल्पना पूर्वापार माहिती असली तरी तिची प्रामुख्याने चर्चा सुरू झाली ती एकोणिसाव्या शतकात.
भारतात इंग्रजांनी आधुनिक जगाची ओळख सुरू केली मग या आधुनिक जगाच्या ओळखीचा विरोध करण्यासाठी 'सनातन' यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला.
ब्रिटिश राजवटीत आधुनिक शिक्षणाचे वारे वाहू लागले आता नीट जगाला परिचय होऊ लागला कालबाह्य रूढी परंपरांना प्रश्न विचारले  जाऊ लागले आणि आधुनिक जगाचा  पुरस्कार झाला .यांच्यात वाढ झाली आणि तेव्हापासून सनातली हे कट्टर झाले.
सनातनी कट्टर झाले म्हणजे नेमके काय झाले?
कारण त्यांनी स्त्री शिक्षणाला आणि विधवा विवाह यासारख्या अनेक सामाजिक सुधारणांचा प्रखर विरोध केला.
सावित्रीबाईंच्या स्त्री शिक्षणाला त्याच्या विरोध झाला. स्त्रिया शिकल्या तर धर्म बुडेल. या विचारांना प्रेरित होऊन त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण फेकले दगड मारले.
तो झाला इतिहास विसरता कामानये.इतिहास खूप मोठा आहे.संत तुकोबा,संत ज्ञानदेव आणि राजे शिवराय यांचा विरोध हे सनातनी डोक्याची करामत होती.
आता सनातन होण्याची नियम आणि विचारधारा काय आहे ते  पाहूया.
हे लक्षात ठेवावे की सनानात हा धर्म नसून ती एक भ्याड वृत्ती आहे.सनातन आणि हिदू धर्माचे नाते काय? तर नाही हे उत्तर होय.
१.जातीय व्यवस्था मानतो.
२ माणसात भेदभाव निर्माण करतो.
३.आरक्षणाला विरोध करतो.
४.स्त्री शिक्षणाच्या विरोध करतो.
५.स्त्री स्वांत्र्याला विरोध करतो.
६.स्त्रियांना डोक्यावर पदर घ्यावा,चूल आणि मूल हे आपले कार्यक्षेत्र ठेवावे.
७.पती निधनानंतर केश वपण करावे,सती जावे.
८.सनातन ची चिकित्सा होऊ नये.
९.सनातन चा विरोध करू नये.
नियम पहा...
१.सप्तसिधुबंधी : तरी सनातनी स्वतः जगभर फिरत असतात.
२.जात व्यवहार: सनातन सोडून सर्व मजुरीची कामे इतर जातीतील करता.ते त्यांना चालते.
३.स्त्रीशिक्षण नको: तरी आज सर्व सनातनी स्त्र्या शिक्षण घेतात.
थोडक्यात स्वतः सनातनी हे सगळे नियम धाब्यावर बांधून ,आग दोंबत आहेत की ,सनातन खत्रे मे है.सनातन( धर्म ?) बुडतो आहे?
नक्की कोण बुडतो आहे ? हे भक्ताने समजावे.


Thursday, August 17, 2023

अण्णाभाऊ यांचे मारे करी .


डोकं ठिकाणावर आहे का?

                      प्रा. बी. आर. शिंदे ; (विशेष शिक्षण ) नेरूळ नवी मुंबई ७०६ .

जसे मला कळते आहे, १९७२ पासून अण्णाभाऊ साठे यांचेवर नुसते फालतू भाषण एकूण थकलो आहे.माझ्या सारखे कैक तोच प्रश्न मनात करीत आहेत.हे सत्य आहे.उठ सुठ सोम्या गोम्या आमच्या कॉम्रेड साहित्यकाराला ,कम्युनिस्ट (Not a Marxist, he was a  Comrade   )  येवढ्या पाण्यात पाहतो आहे की ,आमचा बाप दीड दिवस शाळेत जाऊन साहित्यरत्न झाला.गरिबी हालाकी मधून दिवस काढले ? पाई चालत मुंबई गाठली.असे अपमानास्पद छातीठोक पणे बोलत असतो आणि ते आम्ही एकून गप्पा ही बसतो . ?

मा . माझी आमदार पी टी कांबळे ते मा. आमदार सुधाकर भालेराव असे अनेक आमदार होऊन गेले पण मला एकच आमदार भावले ते म्हणजे मा. भालेराव सर . 

खूप पोटतिडकीने समाजासाठी कार्य करणारे . 

यांनी कितीही संपत्ति कमवली असली तरी  कमवू द्या . तुमच्या खिशातून देत आहेत का ? शेवटी मांगाचा ढाण्या वाघ आहे . तब्बल दोन वेळा आमदार होणे हे कांही सोप्पे नाही ? 

समाजातील आमदारकिचा इतिहास पहिला तर कुणी  गाणे गावून आमदार झाले तर कुणी अण्णाभाऊ यांची छककड गावून आमदार झाले . माझ्या उदगीर राखीव मतदार संघचे  पहा . अनेक आमदार दिले आम्ही पण मा. भालेराव साहेब यांच्या कार्याला तोड नाही ? खरे आमदार . 

असो तो माझ्या विषय नाही असे म्हणणे हे तेवडेच घातक  आहे . कारण बाबासाहेबाणी सत्तेत जा हे सांगून गेले . म्हणून सत्तेत असताना आपले दु:ख मांडणारे नेते अजून भेटले नाहीत ? ही समाजाची खंत आहे . एक म्हण आहे , साहेबाच्या पुढे आणि मागे जाऊ नये ,नाहीतर तुम्ही संपला म्हणा ,या उक्ती प्रमाणे आपले काम भले आणि मी भला  असतो . 

नेते पुढारी हो ,अरे अण्णाभाऊ कांहीं गरीब नव्हते? त्यांचे कडे शेती होती .शेतकरी होते.शेतीत मशागत करीत होते.पण तिथे त्या शेतीत  त्यांचे मन रमले नाही .गाव सोडून मुंबई ला जाऊ तेथील गरीब ,गिरणी कामगार ,मिल मजूर यांच्या बाजूने आपण लढू संघर्ष करू या वैश्विक हेतूने ते राजधानी मुंबई येथे आले होते.

मला या लोकांचे अजब वाटते आहे.त्या काळात शाळा होत्या का? बहुजन वर्गाला शिक्षण संधी होत्या का? गाव कुसा बाहेरील लोकांना शिक्षण होते का? आरे तुम्ही वेशी बाहेर होते . गावा बाहेर होते . फेकलेली जमात होती ( Read : who where Shudras ? ) तरी म्हणे आम्ही या देशाचे पाइक ? 

ये आझादी झुटी है ,असे सांगणारा माणूस देश स्वातंत्र्य साठी त्या इंग्रज लोका विरुद्ध  का लढेल ? इंग्रज आले म्हणून शिक्षण तुम्हाला माहिती झाले ? नाहीतर पाटलाच्या वाड्या शिवाय दुसरी चौकट माहिती होती का ? 

येथील अश्या वाईट शिक्षणाला तिलांजली देऊन .अण्णाभाऊ 'लोक लढ्यासाठी ' मुंबईत आले.हे सांगायला जमत नाही का ? ते मुंबईत मजुरी करण्यास आले होते का ? असे हिडीस भाषणातून का सांगता . बाळ मनावर काय बिंबवायचे आहे आपणास ? तुम्ही आर एस एस च्या भागवत सारखे का अण्णाभाऊ विषयी बोलत आहेत . याचा अर्थ मी असा घेईन की आपण आर एस एस च्या 'गाय माय चे सेवक'  आणि भक्त आहेत . हे आम्ही आंबेडकरवादी बहुजन खपवून घेणार नाही ? कदापि नाही ? 

कॉ . अण्णाभाऊ समजून घेत असताना कुणी त्यांना वेगळ्या  पदव्या मागत आहेत.ते तर भारतरत्न आहेत.फक्त नाव कोरले गेले नाही.

सूर्याला आरसा कश्याला? अन्याय आणि न्याय यातील फरक समजावण्यासाठी त्यांनी आपल्या समोर ' फकिरा ' सादर केली.तिच कादंबरी महामानव बाबासाहेब डॉ भीमराव आंबेडकर यांना अर्पण केली.किती मांग लोकांच्या घरात ही कादंबरी आहे?

पर्वा मागच्या महिन्यात मी पुण्यात एक कार्यक्रमात गेली असता एक व्याख्याते यांनी  विचारले की फकिरा कोणी कोणी वाचली आहे? 

फक्त दोन लोकांनी हात वर केला होता? किती शरमेची बाब आहे.एकीकडे अण्णाभाऊ चे गुणगान गाता आणि दुसरी कडे त्यांच्यावर घनाघात करीत आहेत. त्या सभेत लाज वाटली ?

१ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट नाच गण्यात तल्लीन झालेली  पिढी ,गुटके बहादुर यातील ,अण्णाभाऊ कोणाला कळले का ? उत्तर हे नाहीच मिळणार आहे ? 

अहो ते डॉक्टर होवू द्या की नाही होवू द्या .आपण त्या डॉक्टर व्यक्तीचे किती साहित्य वाचले आहे? हा बिनीचा प्रश्न आहे . 

अण्णाभाऊ काय? पुतळ्यात  आहेत का? कधीच नाही?

ते त्यांनी मांडलेल्या आपल्या वैश्विक साहित्यात आहेत.कथा कादंबऱ्या आणि ग्रंथात आहेत . त्यांचे साहित्य वाचा . वाचा अण्णा वाचा.तुम्ही वाचा आणि आपल्या येणाऱ्या मुला बाळाणा पण वाचायला सांगा . अण्णा कांही पुतळ्यात मिळणार नाहीत ? 

जसा ३१ अगस्त चा आकडा संपेल तसे मांग समाजाच्या घरा दारात मातीचा ,थर्माकोल चा गणपती विराजमान होईल? काय घनघोर अपमान आहे त्या महानवाचा महात्मा फुले ,डॉ बाबासाहेब ,शाहू महाराज आणि आण्णाभाऊ साठे यांनी कुठे आपणास त्यांच्या साहित्यात घरात गणपती बसवण्यास सांगितले आहे का? किती छळ कपट करीत आहेत त्या मानवांचे.

यांचे पाइक म्हणून मिरवत असताना आपल्याला लाज वाटली पाहिजे . ज्या मंडपात महानवाच्या जयंत्या उभ्या केल्या त्याच मांडवात गणपती आणून बसवता ? लाज कशी वाटत नाही आपणास बहुजन  समाजाचे नेते आणि कार्यकर्ते म्हणून समाजात मिरवत असताना . समाजाची किती दिशाभूल करीत आहेत . समाज आपणास माफ करणार नाही ? याद राखा !

अण्णाभाऊ यांनी गण आणि गणपती गवळण मोडीत काढीत आपले ' आदी जनाला ' हा झांजवत आपल्या लाल बावटा पथका मार्फत जनमनात पेरला.हे आपणसा कसे कळत नाही ? त्यांना गणपती ची आराधना केलेल कधी कुठे पुरावे असतील तर द्या आणि खुशाल घरात ,घरावर ,अंगणात जिथे जागा असेल त्या जागेवर गणपती बसवा . किंवा डोक्यावर घेऊन खुशाल फिरा ? 

हे सांगण्यास आपणास लाज वाटते.म्हणे अण्णाभाऊ शाळेत गेले नाहीत? 

हो अण्णाभाऊ शाळेत गेले नाहीत ? नाही जाउद्या , पण परत परत किती वर्ष गुरळ ओकणार आहेत . ? याद राखा खूप मोठी गफलत करीत आहेत. उद्या येणारी पिढी आपल्या तोंडात  शेण फेक्तील?

आपले अण्णाभाऊ तर शाळेत गेले नाहीत? मग मी शाळेत जाऊन काय करू? असे जर आपले मुले विचारतील तर ,तेंव्हा उत्तर तयार ठेवा.? 

काळ बदलत गेला.डॉक्टर बाबासाेबांबद्दल माहिती आहे का?

परदेशात जाऊन बॅरिस्टर होऊन आले? राज्य घटना लिहली  असे एवढेच सांगितले जाते. पण तसे नाही ? 

त्यांनी संघर्ष केला आणि त्यातून दलित उठावाच्या ठिणग्या पडल्या , सारा आसमंत पेटून उठला.गुलामी चे साखळ दंड तुटले माणसे ,दलित स्वतंत्र  झाला ,हवा मोकळी झाली.

याचा धागा पुढे रेटीत अण्णाभाऊणी जग बदलाची धार आणि कवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कडे झुकती केली .अर्पण केली . ते आंबेडकरवादी होते ? ते तसे नसते तर त्यांनी 'जग बदल घालूणी घाव सांगून गेले मज कार्ल मार्क्स राव ' असे कवण नाही का गायीले असते ? 

प. पू. डॉक्टर बाबासाहेब अण्णाभाऊ यांना तेंव्हा कळले त्या काळात कळले ,पण आज आपणास का कळत नाहीत ? या मागचे गौडबंगाल कळायला हवे . 

जगभरात ख्याती असलेले अण्णाभाऊ जगाला काळले ,कारण त्यांनी त्यांचे साहित्य वाचले . आपण त्यांचे साहित्य वाचलेच  नाही ?  तर कळतील कसे ?










 

वट्टपोतक_जातक_चर्या

वट्टपोतक_जातक_चर्या जंगलात जेव्हा भिषण आग लागते तेव्हा ती आग आपल्या मार्गातील सर्वच वस्तुंना जाळुन खाक करते. या भिषण अग्निमध्ये काही निरपराध...